सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

रेल्वे स्टेशन परतुर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...

  परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता परतुर रेल्वे स्टेशन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आर.सी.सी.मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन केले होते, 
     यावेळी रेल्वे पोलीस दलाचे राजेश उबाळे, मेघराज पाटील व आर सी.सी.मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप (दादा) साळवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर,व पत्रकारअशोक ठोके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन सभेची सुरुवात केली यावेळी सर्वांनी सामुदायिक वंदना घेतली यावेळी बोलताना विकास वेडेकर म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राचे पालन केले पाहिजे तसेच समता,स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा देखील आपण जपला पाहिजे आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आपण पुस्तके वाचली पाहिजेत वाचाल तर वाचाल असे त्यांनी यावेळी अभिवादन सभेस संबोधित करताना सांगितले आपण आपले विचार मांडले पाहिजेत नंतर त्यांना ते घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला रमेश कदम, संतोष कदम,दिलीप साळवे, दीपक हिवाळे, अरुण पाडेवार, अंतरा ठोके आरोही पाडेवार, खुशी इंगळे,बाळासाहेब कदम,नीतिन खरात,रवी इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत