सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील आष्टी व अकोली येथील पांदण रस्त्यांच्या कामाची माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी केली पाहणी,पांदण रस्ते पाहून केले समाधान व्यक्त


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
बागायतदार व कोरडवाहू शेतकऱ्यांना, खऱ्या अर्थाने शेतीत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मशागतीसाठी जाणे येणे करणे अतिशय पानंद रस्त्या मध्ये असलेल्या गुडघाभर चिखलामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागतो मात्र आष्टी व अकोली येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून झालेल्या पाणंद रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले
    थेट शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी उत्कृष्ट असे म्हणून रस्त्यावरील काम झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पिकणारी अन्नधान्य सोबतच डाळिंब ,मोसंबी ऊस, केळी ,सिताफळ आदी उत्पादित मालांना शेतकऱ्यांना सहज बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे
उस मुख्य पिक आष्टी व परिसरातील शेतकऱ्यांचे असून केवळ, रस्त्याच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड करता येत नव्हती अनेक फळपिके घेता येत नव्हती अशा परिस्थितीत हे पांदण रस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यांना या पांदण रस्त्याच्या माध्यमातून आपल्या शेतातील फळबाग उसाचे क्षेत्र वाढवता येणार असल्याचे यावेळी आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले
या पांदण रस्त्यामुळे यांत्रिकीकरणाद्वारे शेती करणे ही अतिशय सुलभ झाले असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार असून झालेल्या पांदन रस्त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी रामप्रसाद थोरात तुकाराम जी सोळंके बाबाराव जी थोरात सरपंच मधुकरराव मोरे अमोल जोशी बबलू सातपुते श्रीधर गांजाळे अनंतराव आगलावे डॉ नारायणराव सरकटे बापूराव सोळंके अंकुशराव चव्हाण दामोदर सोळंके आसिफ कच्ची राजेभाऊ तौर, अर्जुन थोरात मुजीब भाई माऊली सोळंके पंजाब देशमुख भुजंग गाते रवी देशमुख रामराव सोळंके संजय सोळंके अशोक शेळके बाबासाहेब शिंदे प्रकाश नंदुरकर हनुमान इंगळे परसराम नरसाळेउमेश सोळंके, रमेश थोरात, मारोती थोरात,अल्लताब कुरेशी विठ्ठल सोळंके नागेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत