सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जगात सर्वात श्रेष्ठ वारकरी संप्रदाय आहे तो जपला पाहिजे..- विलास महाराज गेजगे..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
=परतूर तालुक्यातील येनोरा येथे दिनांक 16 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ची सोमवारी काल्याच्या कीर्तनाचे सांगता झाली. महान संत शिरोमणी यांच्या चार चरणाचा अभंग घेऊन महाराजांनी कीर्तन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आजची वारकरी संप्रदायची परंपरा ज्येष्ठ आहे वारकऱ्यांनी संताचे विचार जो पासत पुढच्या पिढीला संग्रहित ते विचार ठेवायचा आहे. संताचे विचार घराघरा पर्यंत पोहचवणे हे सर्व वारकरी धारकरी यांची जबाबदारी आहे. माणसाने आजच्या काळात माणसाने सैरावैरा धावू नये . 
       या विषयी चिंतन करणे गरजेचे आहे. या कीर्तनाला भाविक भक्तां चा मोठा प्रतिसाद मिळाला या कीर्तन सोहळ्याला सर्व भाविक भक्त वारकरी संप्रदाय, गायक वादक, मृदुंग वादक, काकडा नेतृत्व, पारायण नेतृत्व, गाथा भजन, हरिपाठ नेतृत्व, व सर्व भजनी मंडळ व गावकरी मंडळी उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत