सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

साईनाथ यात्रेचा शुभारंभ यात्राकाळात दिंडी मार्ग व परिसरातील विद्युत दिवे चालू करावे - मा.आ. जेथलिया

 परतूर प्रतिनीध कैलाश चव्हाण                                      गेल्या 64 वर्षाची परंपरा असलेल्या परतूर येथील साईबाबा यात्रेला दोन वर्षा च्या कोरोनाच्या काळातील खंडा नंतर यंदा उत्साहात सुरवात झाली, आज दिनांक 24 रोजी मा.आ. सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादीचे जालना जिल्हा युवक अध्यक्ष कपिल आकात, वैजनाथ बागल,बाबुराव हिवाळे, रहेमूसेठ कुरेशी, राजेश खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्तीतीत जागा वाटपाचे उदघाटन संपन्न झाले 
      या वेळी मोठ्या संख्येने परिसरातील व्यापारी, नागरिकांची उपस्तीथी होती. उद्या पासून या यात्रेला सुरवात होत असून सदरलील यात्रा 5 फेबुरवारी पर्यंत चालू राहणार असून महाप्रसादाने याची सांगता होणार असल्याची साईनाथ मंदिराचे पुजारी रामेश्वर वंगुर यांनी दिली. यावेळी आपल्या मनोगतात मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की दोन वर्षाच्या खंडा नंतर चालू होणाऱ्या या यात्रेला यंदा जास्तच महत्व येणार असून यावेळी यात्रेत पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक, यात्रेकरू हजेरी लावणार, याबाबत मी पालिका प्रशासन तथा स्वच्छता विभागाला सूचना देत यात्रेचा परिसर स्वच्छ करून घेतला, योगा योगाने यंदा दिंडी मार्गाचे काम पूर्ण होऊन साईनाथ मंदिर ते पेट्रोल पंप, रेल्वे स्थानक रोडवर विधुत खांब उभारले आहे, यात्रा निमित्त सदरील विद्युत पुरवठा चालू करण्याच्या सूचना मी संबंधित विभागाला दिल्या असल्याने म्हणाले, यापूर्वीच दसऱ्याला साईनाथ मंदिर चौकातील हायमास्ट दिवा नगरपालिकेकडून चालू केला असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत