सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात जागतिक हिंदी दिवस साजरा

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय हिंदी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  प्राचार्य डॉ. भारत खंदारे  होते 
       या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते प्रा. बद्रीनारायण बिडवे यांनी हिंदी भाषेचा वापर आणि गरज याविषयी सांगितले. त्यांनी सांगितले की, भारतातील सर्व जाती-धर्मांना एकत्र ठेवण्याचे महत्त्वाचे काम हिंदी भाषा करते. त्याच वेळी, जगभरात पसरलेल्या भारतीय लोकांमध्ये आपली मूल्ये आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम करत आहे. हिंदी ही लवकरच राष्ट्रभाषेतून जागतिक भाषा होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समारंभाचे प्रस्ताविक हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.विजयानंद गंगावणे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जागतिक हिंदी दिन कधी आणि का साजरा केला जातो या विषयावर आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की भारतात 10 जानेवारी 1975 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. परदेशात गेलेल्या भारतीयांना त्यांच्या देशाशी जोडण्याचा मूळ उद्देश होता. ही परिषद दरवर्षी 10 जानेवारी रोजी जगातील विविध देशांमध्ये भारतीय दूतावासाद्वारे साजरी केली जाते. 2006 मध्ये, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील जागतिक हिंदी परिषदेच्या शुभ मुहूर्तावर 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी हा जागतिक हिंदी दिन साजरा केला जाऊ लागला.अध्यक्ष प्राचार्य डॉ.भरत खंदारे यांच्या भाषणाने समारंभाची सांगता झाली.आभार डॉ.वजीर यांनी तर संचालन डॉ.माने यांनी केले.समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.भारत सुरुंग,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रवी प्रधान, डॉ.टकले, डॉ.कोटलवार, डॉ.पाठक, डॉ.कुलकर्णी, डॉ.मनवर, डॉ.मुजमुले, डॉ.दुबाले, डॉ.बोथीकर, डॉ.गायके आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत