सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पाटोदा येथे समर्थ विद्यालयात प्रेरणा सत्र संपन्न.

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] ता.परतुर येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेरक व तज्ञ मार्गदर्शक श्री देविदास आठवे सर यांनी विद्यार्थ्यांना विवीध ऊदाहरणे देवुन अभ्यास कसा करावा - स्पर्धा परिक्षेची तयारी - वाचन - लेखन - चिंतन -मनन या विषयी प्रेरणादाई असे मार्गदर्शन केले.
    बाल वयातच आपले ध्येय निश्चित करुन ध्येयाच्या पुर्ततेसाठी कठोर मेहणत करण्याची तयारी प्रत्येक विद्यार्थ्यांने मनात बाळगली पाहीजे.असे प्रतिपादन केले.
चांगल्या सवयी आपणास ध्येयापर्यत पोहचण्यास मदत करतात.तेव्हा प्रत्येकाने मोबाईल , टि.व्ही. चा आवश्यक तेवढाच वापर करावा असे आग्रही प्रतिपादन केले.
दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनी मुख्य मार्गदर्शक श्री देवीदास आठवे यांचे शाल पुष्पहार घालुन स्वागत केले. 
     ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधे प्रचंड क्षमता असते त्या क्षमतेचा ऊपयोग करुण प्रत्येकाने मोठे यश मिळवावे व त्या साठी प्रेरणा मिळावी म्हणुन या ऊपक्रमाचे आयोजण करण्यात आल्याचे सांगितले .
    प्रास्ताविक श्री पाराजी रोकडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाचे सहशिक्षक सर्वश्री गाडेकर , ऊध्दव खवल , , कुळकर्णी , जोशी , खवल चत्रभुज , डवरे , वखरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी ऊपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत