सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

कृषी बाजार समिती निवडणूक युवा ने लढवावी - सचिन खरात (ता.अध्यक्ष शिवसंग्राम)


 परतुर । प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
        परतुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आता युवा शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी अन् सुलतानी दोन्ही संकटे ओढवत असताना शेतकरी पुत्रांनी हक्काच्या कृषी बाजार समिती व शेतकरी हित चळवळ उभा करावी परतुर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या बाबत समाधानकारक असे काहीच काम होत नाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी आता शेतकरी युवा पुत्रांनी पुढाकार घेतला असून शेतकरी कृषी बाजार समितीची निवडणूक लढवावे असे आव्हान शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी केले. कृषी बाजार समितीमध्ये गेल्या काही काळापासून निवडक व्यक्तींची सत्ता आहे. या ठिकाणी अपहार, असुविधा या बाबी वारंवार पुढे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीत विश्राम व्यवस्था चांगली नाही, बाजार समिती इमारती बांधकाम झालेले आहे मात्र तेथील परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांचा विश्वास संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे जिंकू शकलेली नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढाकार घेने आवश्यक आहे संपूर्ण जागेवर युवा शेतकरी उभे करून विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हंटले आहे. कृषी बाजार समितीमध्ये गेल्या काही काळापासून निवडक व्यक्तींची सत्ता आहे. यावेळी बदल होणं आवश्यक आहे.या कृषी बाजार समिती ठिकाणी अपहार, असुविधा या बाबी वारंवार पुढे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीत विश्राम व्यवस्था चांगली नाही, बाजार समिती इमारती बांधकाम झालेले आहे मात्र तेथील परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांचा विश्वास संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे जिंकू शकलेली नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढाकार घेने आवश्यक आहे संपूर्ण जागेवर युवा शेतकरी उभे करून विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे सचिन खरात यांनी म्हंटले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत