सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी निवड.

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
विस्तार अधिकारी तथा पदवीधर शिक्षिका यांची अविष्कार सोशल एज्युकेशन फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर मराठवाडा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे. अविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षापासून कार्यरत संस्था आहे. संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करते. या वर्षाच्या पुरस्कारासाठी संस्थेच्या वतीने विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण शैक्षणिक (प्रशासकीय कार्य) क्षेत्रात केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आपणास राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन आपला गौरव करीत आहोत असेही दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे. या पुरस्काराने वि. अ. डॉ. अंजली कोळकर यांचे सर्वत्र स्वागत होत आहे सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि. 26 मार्च रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत