सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
    शहरात मागील महिन्याच्या ३० तारखेला राम नवमी मिरवणुकी दरम्यान जुना जालना भागातील हॉटेल व्यावसायिक विष्णू उर्फ विकी श्रीराम सुपारकर यांची छातीत चाकूने वार करून निघून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे मयत यास 2 वर्षाचा छोटा मुलगा असून, ज्या दिवशी अंत्यसंसकार करण्यात आले त्याच दिवशी मुलगी जन्माला आली. अश्या एका क्लेशदाई घटनेचा अनुभव सुपारकर परिवारास आला. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी त्याब्यात घेतले होते, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान आज दी. 12 एप्रिल रोजी शहरातील नागरिकांच्या वतीने आरोपींना फाशीची शिक्षा, 15 दिवसात दोषारोप पत्र दाखल करावे, आरोपींवर मोक्का कायदा व MPDA कायद्याने कारवाई करावी, तसेच उच्च अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा ई. मागणी करत लाड गवळी समाज व मित्र परिवार आणि शहरातील नागरिकांच्या वतीने शनी मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत मुक मोर्चा काढला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत