सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुरात हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभा यात्रा


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    हनुमान जन्मोत्सव निमित्ताने परतूर शहरात गाव भागात  आगदि कमी वेळात भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.       
           दरम्यान ,यावेळी सहा फुटांची हनुमानाची मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवनुक काढण्यात आली.शहरातील भाविकांनी मिरवनुक मार्गावर रांगोळी काढल्या होत्या व ठीक ठिकाणि पुष्पवृष्टी करून पूजन करण्यात आले.यावेळीं मोठ्या संख्येने हनुमान भक्तांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सावता काळे,रामेश्वर उबाळे,रोहित कपाळे,कृष्णा तरोडकर, कैलास मुजमुले, अमृत बागल, राधेश्याम राऊत, विष्णु इगळे, अजय ईगळे, मोहन मुजमुले, अनिल सागुळे, प्रल्हाद ईगले , ऋषी काळे, नागेश तराशे, कुमार हनवते, लखन अग्रवाल, ऋषी कऱ्हाले, श्रीकांत उबाळे यांनी परिश्रम घेतले.



Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत