सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

नाल्यांच्या साफसफाई साठी स्वच्छता अभियान राबवा:-सचिन खरात



परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्ठिने नगर पालिका प्रशासनाने परतुर शहरात नाल्यांची साफसफाई करून जंतू नाशक फवारणी करुण घ्यावी सोबत घाणीची विल्लेवाट लावण्यासाठी शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी *शिवसंग्राम संघटनेने तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली आहे*
शिवसंग्राम संघटनेने पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण शहरात वॉर्डासह मुख्य रस्तावर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर घाणीची विल्लेबाट लावणे आवश्यक आहे. जेणे करून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न उदभावणार नाही. मे महिना संपल्यानंतर मान्सून ची सुरुवात होणार आहे. आशा परिस्थितीत शहरातील नाल्यांची साफसफाई होणे ही तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा नेहमी प्रमाणे पहिल्या पावसातच नाल्यांचे पाणी रस्त्यावर येणार यात शंका नाही. वेळेत जर नाल्यांची साफसफाई केली तर पुढील मान्सून काळातील समस्यांचा सामना शहरवासियांना करावा लागणार नाही. मात्र नगर पालिका प्रशासन पावसाळ्याच्या तोंडावर थातूर मातूर स्वच्छता मोहीम राबविते. परिणामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे शहरवासियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने शहरातील घाणीची विल्लेवाट लावावी, शहरात जंतू नाशक फवारणी बरोबर मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई करावी यासाठी शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा आंदोलन करू अशी मागणी नगर पालिका प्रशासनाकडे शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात मनोज वटाने संदीप खवल अमुत राठी सखाराम माठे आदींनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत