सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

प्रा.शाम जवळेकर यांना गणित विषयात ph.D प्राप्त

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
स्वामी विवेकानंद बीसीए महाविद्यालय मंठा चे प्रभारी प्राचार्य  शाम दिनकरराव जवळेकर यांनी नुकतेच मॅथेमॅटिक्स या विषयामध्ये प्रोफेसर डॉक्टर शोएब अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर करून विद्यावाचस्पती(ph.D) हि पदवी प्राप्त केली आहे. 
अनाल्याझिंग द असिम्प्टोटिक प्रॉपर्टीज ऑफ झिरो सेट्स ऑफ मल्टी वरायटीज पोलिनोमिया अँड डियर प्रॅक्टिकल एप्लीकेशन. या प्रमुख विषयामध्ये शोध प्रबंध सादर केला. या साठी त्यांना गणित विभाग प्रमुख प्रा डॉ शोएब अली सय्यद व बहिस्त म्हणून प्रा डॉ निधी राईकुंदलिया यांनी सहकार्य केले.
   प्रा शाम जवळेकर यांनी मिळवलेल्या यशा बदल संस्थेचे सचिव  कपिल भैया आकात, उपाध्यक्ष  कुणाल दादा आकात,प्राचार्य डॉ भारत खंदारे,प्राचार्य डॉ माणिकराव थिटे,प्राचार्य डॉ सुधाकर जाधव,प्रा डॉ सदाशिव कमळकर,प्राचार्य डॉ मानव ठाकूर,प्राचार्य डॉ शिदे सर, प्रा डॉ भगवानसिग ढोभाल,श्री दत्ता भाऊ पाथ्रीकर,प्रा डॉ शरद कुलकर्णी,श्री अशोक मुळे, प्रभाकर सुरुग,प्रा डॉ बापू सरवदे आदी महाविद्यालयामधील सहकारी मित्र परिवाराच्या वतीने आनंद व्यक्त होत आहे तर सामाजिक,संस्कृतिक,शैक्षणिक शेत्राधील मान्यवरानी देखील अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत