सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अँड.किशनराव अंभुरे यांचे निधन

परतूर: प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
येथील वैद्यकीय अधिकारी तथा सोमेश्वर बाल रुग्णालयाचे संचालक डॉक्टर प्रशांत अंभुरे व प्रकीर्ण अंभुरे यांचे वडील एडवोकेट किशनराव आप्पासाहेब अंभुरे यांचे शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुखद निधन झाले ते 79 वर्षाचे होते किशनराव अंभुरे हे खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन होते. त्यांच्या काळात खरेदी विक्री संघाचा भरभराट झाला होता त्यांच्या कार्यकाळाची आजही आठवण करण्यात येते, माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनदादा लोणीकर यांचे ते मेहुणे होते.
छत्रपती संभाजीनगर येथे अल्प आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंड, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांचे मूळ गाव श्रीष्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गणमान्य व्यक्तींसह, लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी, कामगार वर्ग व त्यांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत