तळणी येथील सकल मराठा समाज बांधवाचे साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात

तिनिधी | तळणी( रवि पाटील)
   मंठा तालूक्यातील तळणी येथे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली होती याच साखळी उपोषणाचे रुपांतर आज मंगळवार पासून आमरण उपोषणात करण्यात आले आहे नानासाहेब खंदारे याच्या नेतृत्वात हे आमरण उपोषण आज पासून सुरू करण्यात आले तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग या उपोषणात राहणार आहे अंतरवाली सराटे येथे सुरू असलेल्या . मराठा आरक्षणाच्या या लढाई ला व मनोज जरांगे याना पाठबळ मिळावे या हेतुने सकल मराठा समाज या आंदोलनात सक्रीय झाला असल्याचे उपस्थित मराठा बांधवानी सांगीतले आहे तळणी परीसरातील तळणी वडगाव शिरपूर कोकंरबा देवठाणा उस्वद कानडी इंचा टाकळखोपा वाघाळा लिबंखेडा दुधा सासखेडा किर्ला हनवतखेडा व आणखी अन्य गावांचा सहभाग या साखळी उपोषणाला राहणार आहे सुरवातीला छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे एक मराठा कोटी मराठाच्या जयघोषाने बस स्टँन्ड परीसर दुमदुमून गेला 
 या आमरण उपोषणा सदर्भात जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले आहे 

काल सोमवार रोजी मंठा तहसीलदार रुपा चिञक यानी भेट देऊन सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्य सोबत चर्चा कली व शातंता पूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आव्हाहन केले 
    तळणी येथून जवळच उस्वद येथील शाळकरी मुंलांनी आरक्षण मिळेपर्यन्त शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे काल वर्ग तिसरा ते आठवी पर्यन्तच्या विद्यार्थ्याच्या ऑनलाईन राज्य परीक्षाना सुरवात होणार होती परंतू विद्याथ्र्यानी शाळेतच न जाण्याचा निर्णय घेतला तसा व्हीडीओ समाज माध्यमांवर काल झळकला आहे 
    मराठा समाजाला जोपर्यन्त आरक्षण मिळत नाही तोपर्यन्त गावामध्ये सर्वपक्षीय नेत्याला येण्यास बंदी घालण्यात आली आहे तसा ठराव ग्रामपंचातीने घेतला आहे सकल मराठा समाज हे आंदोलन शांततेच्या मार्गाने लढत आहे सरकारने मराठा समाजाच्या भावना समजुन घेऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण समाजाला द्यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारू नये आपल्या समाजाचा इतीहास हा लढण्याचा आहे आत्महत्या सारखा चुकीचा मार्ग निवडून आपल्या स्वंकीयाना त्यामुळे आधिकच ञास होतो अशा भावना यावेळी उपस्थीतानी व्यक्त .केल्या आज सुरू या आमरण उपोषणाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश