सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

संघ' संस्थेच्या वतीने गरजू महिलांना दिवाळी भेट किराणा सामानाची कीट वाटप ; संस्थेचा सामाजिक उपक्रमाने शुभारंभ

'
जालना प्रतिनिधी समाधान खारात
'सोसायटी फॉर सोशल,अँग्रीकल्चरल,नॅचरल ग्रोथ अँड हेल्थ' अर्थात 'संघ' ( SANGH ) या सेवाभावी संस्थेच्या शुभारंभानिमित्त गरजू महिलांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा कीट वाटप करण्यात आल्या. सिरसवाडी ( ता.जालना) येथे हा उपक्रम नुकताच घेण्यात आला. 
     यावेळी जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध 'कार्ड' संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, 'दैनिक बदलता महाराष्ट्र'चे कार्यकारी संपादक विनोद काळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. 
 'संघ' संस्थेचे अध्यक्ष संघपाल वाहूळकर,सचिव वंदना 
वाहूळकर, सोमनाथ खळेकर,गजानन गाढे,अमोल लिहीनार,सुयोग कुलकर्णी यांनी ही सेवाभावी संस्था स्थापन केली असून कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संस्थेचा सामाजिक उपक्रम राबवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी श्री. तायडे, पत्रकार विनोद काळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी गावातील गरजू महिलांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत