सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

संघ' संस्थेच्या वतीने गरजू महिलांना दिवाळी भेट किराणा सामानाची कीट वाटप ; संस्थेचा सामाजिक उपक्रमाने शुभारंभ

'
जालना प्रतिनिधी समाधान खारात
'सोसायटी फॉर सोशल,अँग्रीकल्चरल,नॅचरल ग्रोथ अँड हेल्थ' अर्थात 'संघ' ( SANGH ) या सेवाभावी संस्थेच्या शुभारंभानिमित्त गरजू महिलांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा कीट वाटप करण्यात आल्या. सिरसवाडी ( ता.जालना) येथे हा उपक्रम नुकताच घेण्यात आला. 
     यावेळी जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध 'कार्ड' संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, 'दैनिक बदलता महाराष्ट्र'चे कार्यकारी संपादक विनोद काळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. 
 'संघ' संस्थेचे अध्यक्ष संघपाल वाहूळकर,सचिव वंदना 
वाहूळकर, सोमनाथ खळेकर,गजानन गाढे,अमोल लिहीनार,सुयोग कुलकर्णी यांनी ही सेवाभावी संस्था स्थापन केली असून कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संस्थेचा सामाजिक उपक्रम राबवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी श्री. तायडे, पत्रकार विनोद काळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी गावातील गरजू महिलांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत