सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर येथे श्रीराम जन्मभुमी मंदिर व शिवराज्यभिषेक सोहळा आयोजनाची रविवारी बैठक

परतुर प्रतिनिधी  कैलाश चव्हाण 
श्रीराम जन्मभुमी मंदिर व शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी आयोजनाची बैठक परतूर येथे रविवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य श्रीराम जन्मभुमी मंदिर पुर्णत्वाकडे जात आहे. दि 22 जानेवारी 2024 मध्ये ते पुर्ण होवुन रामलल्लाची मुर्ती त्याठिकाणी विराजमान होणार आहे. हा सर्वच हिंदुसाठी आनंदाचा क्षण आहे. तसेच परकीय आक्रमण परतवुन हिंदुचा  सार्वभौम राजा म्हणुन छत्रपती शिवरायाचा "शिवराज्याभिषेक सोहळा  झाला. या घटनेस 6 जुन 2024 रोजी 350 वर्ष पुर्ण होत आहे. या आनंदाच्या क्षणाचा आनंदोत्सव कसा साजरा करायचा याबाबत प्रत्येक हिंदु बांधवापर्यंत श्रीराम जन्मभुमी निर्माण न्यास समितीतर्फ देण्यास आलेल्या अक्षता पोहचविण्याच काम स्वयंसेवक करणार आहेत. दोन्ही आनंदमयी क्षणात जास्तीत जास्त हिंदुबांधवाचा सहभागी व्हावे. यासाठी तालुक्यातील स्वयंसेवक, बजरंगी, हिंदुत्ववादी संलग्न संघटना यांची व्यापक बैठक दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रविवार वेळ दुपारी 3 वाजता इंदिरा मंगल कार्यालय, येथे आयोजित करण्यात आली. जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत