बनावट कागदपञ तयार करून बिल घेतले ?वाघाळा ग्रामपंचायतचे जिल्हाधिकार्याना निवेदन


तळणी  प्रतिनिधी रवी पाटील 
  येथून जवळच असलेल्या मौजे वाघाळा येथील सन २०१८ -१९ मध्ये गौण खणिज लिलावा अतर्गत ग्रामपंचायतीना मिळणारा दहा टक्के लाभाच्या रकमेतून वाघाळा येथील पाणीपूरवठा योजनेसाठी दहा लाख एकावन हजार रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता . परतू संबंधीत यञणेने बनावट कागदपत्राच्या आधारावर प्रत्यक्ष्य काम न करता यापैकी पाच लाख पच्चवीस हजार रुपये उचलून घेतले आहेत उर्वरीत रक्कम ही आज ही ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा आहे सबंधीत यञणेने आधीचे काम न केल्याने आता ग्रामपंचायतला खात्यावर असलेल्या रकमेमधून हे काम करण्यास मोठी अडचण येत आहे नियमा प्रमाणे संबंधीत एजन्सी ला हे काम पूर्ण करुन देने बंधन कारक आहे ग्रामपंचातच्या वैतीरीक्त ही एजन्सी असल्याने ग्रामपंचायत ला या कामासाठी अनेक अडचणी येत आहेत संदरील एजन्सी राजकुमार जनार्धन बोराडे या नावाने असून याच एजन्सीने हे बील उचलून घेतले असून उचललेले बील त्या एजन्सी कडून वसुल करण्यासाठी जिल्हाधीकार्यानी योग्य ती कारवाई करावी व सबंधीत एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सरंपच सुनील कांगणे , सिताराम ठाकरे , भिकाजी कांगने , उर्मिला बोडे , व सर्व ग्रामपंचायत सदस्यानी जिल्हाधीकारी यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात