जे जाळतय त्याला आधी जळावं लागतं - ह भ प समाधान महाराज शर्मा.

परतूर शहरात रंगली शिव कथा.
लाखो भाविकांनी कथामंडप ओसंडला.
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर शहरात माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित शिव  कथा सांगताना समाधान महाराज शर्मा यांच्या ओजस्वी वाणीतून दुसऱ्या दिवशी
जे जाळतय त्याला आधी जळावा लागतं वातीला तेल जाळतं पण त्या तेलाला आधी जळावं लागतं त्यामुळे दुसऱ्याला जाळणं बंद करा असा उपदेश ह भ. प. समाधान महाराज शर्मा यांनी आज कथेच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित भाविकांना दिला.
परतूर शहरात माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांच्या परिवाराच्या वतीने संगीतमय भव्य शिवकथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिव कथेचा विस्तार करताना दुसऱ्या दिवशी समाधान महाराज शर्मा म्हणाले की, दुसऱ्याला जाणाऱ्याला आधी स्वतःला जळाव लागत. यावेळी त्यांनी दिव्यातील तेल व वात यांचे उदाहरण देऊन जळणे व जाळणे याचे मार्मिक उदाहरण दिलं. गाय पवित्र आहे. तिचे सर्वच उपयोगी पडते दूध, शेन, गोमूत्र मात्र काही लोक कुत्र्याला जीव लावतात. परमार्थातील भामटेपणा बंद झाला पाहिजे, परमार्थ थोडाच करा, पण मनातून करा. गंध कपाळावर थोडाच लावा, पण चारित्र्याचा सुगंध सर्वत्र दरवळू द्या. 'आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा, पाव्यातला सुर जैसा ओठातून ओघळावा.'या ओळी सुंदर आवाजात गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अंधश्रद्धा ठेवून काहीही करू नका हृदयात श्रद्धा ठेवून करा. अभ्यास आणि श्रद्धा यात फरक आहे. महादेवाचे भक्त म्हणून विनाकारण आवडंबर माजवू नका. महादेवाची पूजा करताना प्रत्येक कृतीला महत्त्व आहे. भस्म, बेल गंध, त्रिपुंड, वाराची उत्पत्ती, विविध देवांचे वार, गाय, ब्राह्मण, देवयज्ञ, भगवान शंकराची पूजा, पंचगव्य, पंचामृत, पिंडीचे स्नान, मंत्रजप, भस्म महत्व आदी विषयावर शिव कथेचे प्रवक्ते ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांनी सखोल चिंतन करून आपल्या ओजस्वी वाणीतून सोप्या भाषेत शिवभक्तांना महत्व पटवून देऊन समजावून सांगितले. यावेळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, माजी नगराध्यक्ष विमलताई जेथलिया,आशिष जेथलिया,प्रवीण जेथलिया, नितीन जेथलिया, मनोहर खालापुरे, राजेश भुजबळ, दिलीप नहार, किसनराव मोरे, आनंद सोमानी, रामराव लावणीकर, शामसुंदर काळे,बाबाजी गाडगे,इंद्रजित घनवट, सचिन बोंबले,बाबुराव हिवाळे,अविनाश शहाणे,महेश दहिवाळ, राहुल सातोनकर,डॉ. काकडे, मंठा येथून आलेले सर्व प्रभात फेरी चे सदस्य,आरती चे मानकरी,सेवेकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात