सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नीरोप सभारंभ संपन्न

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हा
  परतूर येथील न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज  येथे नवविच्या विद्यार्थ्यांकडून दहाविच्या विद्यार्थ्यांना दि.२१ बुधवार रोजी निरोप सभारंभ देण्यात आला या मधे नववीच्या विद्यार्थ्यांनी   भरगच्च करमणुकिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. 
  या वेळी दहाविच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पेपर विषयी तसेच दहावी नंतर काय? याबद्दल ही सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दहाविच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष  नारायण सोळंके, सौ पार्वताबाई सोळंके, कार्याध्यक्ष  गणेश सोळंके, सचिव सौ छाया बागल, प्रिन्सिपल साम वर्घिस व संपूर्ण शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते  
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवविची विद्यार्थ्यांनी कार्तिकी कवडे हिने केले तर आभार प्रदर्शन सेजल सवने हिने व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत