दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती

Image
जालना | प्रतिनिधी समाधान खरात  दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय दिगंबरराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्रानुसार, विजय जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, वंचित, पीडित व अन्यायग्रस्त समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या विचारांनुसार कार्य करावे, अशी अपेक्षा संस्थापक-अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दलित महासंघ ही महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक संघटना असून, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. यावेळी विजय जाधव यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

शिवसेना भटके विमुक्त विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी तरवटे


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
परतूर (प्रतिनिधी): हनुमंत दवंडे शिवसेना भटके विमुक्त विभागाच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी निष्ठावंत शिवसैनिक शिवाजी तरवटे (परतूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे, यांच्या शिफारशी वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी शिवाजी तरवटे यांची नियुक्ती केली असून हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी 
विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तळागळातील भटक्या विमुक्तांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांना संघटित करून जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवावे असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले .या नियुक्ती बद्दल शिवाजी तरवटे यांचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत