सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

डॉ. स्वप्नील मंत्री यांचा वाढदिवस विकसीत भारत हर दिल में मोदी हा अनोखा अभियान राबवून साजरा

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर येथील बालरोग तज्ञ तथा आहार विशेषज्ञ डॉ. स्वप्नील मंत्री यांचा वाढदिवस विकसीत भारत के निर्माण के लिए हर दिल में मोदी हा अनोखा अभियान राबवून साजरा करण्यात आला.
परतूर येथील बालाजी मंदिर संस्थान येथील मैदानावर पोलिस भरतीसाठी ट्रेनिंग घेत असलेल्या तरुण युवकासोबत जॉगिंग करून विकसीत भारत ह्या संकल्पनेवर आधारित चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अभूतपूर्व विकास आणि प्रगतीचा अनुभव घेत आहे, अशी भावना डॉ. मंत्री यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थीत युवकांसोबत आरोग्य व त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली व विकसित भारतासाठी हर दिल में मोदी हा संकल्प घेण्यात आला. ह्या अभियानात डॉ. सुधीर आंबेकर, अजित पोरवाल, करण काळे, विजय पवार, महेश गोरे, अनिकेत भोकरे, भागवत राऊत, योगेश सर, लालू काळे, अजय काळे, मंगल पवार, अभिजित जोशी, आनंद कोटेचा, डॉ. शितल लाहोटी, आनंद बगडीया, सखाराम कुलकर्णी, नरेश कांबळे, अमोल अग्रवाल, नरेश सोनवणे, प्रणय मोर, पूनम फुलमाळी, गणेश काळबांडे व युवकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत