सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा संघ विभागीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी रवाना.

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय आट्या पाट्या स्पर्धेत न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकविला त्यांना या  स्पर्धेचे कोच म्हणून  विनायक बोरकर यांनी मार्गदर्शन केले तर  कॅप्टन रविन्द्र खरात, रवीराज गोलांडे, हनुमान सोळंके, विश्वजीत बेरगूडे यांच्या सह  विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवून  शाळेचे नावलौकिक केले  या नंतर शाळेतील विध्याार्थी विभागीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष  गणेश सोळंके , मुख्याध्यापक  शाम सर क्रिडा शिक्षक  विजय सर यांनी  व्यक्त केला  या सह  शिक्षक वृंदानी पुढील स्पर्धेसाठी विध्यार्थ्याना  शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत