सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पाटोदा [ माव ] श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात वीरबाल दिनानिमीत्त निमीत्त चित्रप्रदर्शनी चे आयोजन.


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
    वीरबालक बाबा जोरावारसिंह जी व बाबा फतेहसिंह जी यांच्या संपुर्ण जीवनावर आधारीत रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
सव्वीस डिसेंबर हा दिवस संपुर्ण देशात विरबालदिन म्हणुन साजरा केल्या जातो.
आपृल्या मातृभुमीप्रती - धर्माप्रती  प्राणत्याग करनारे कोवळ्या वयातील बालकांचे हे बलिदान चिरकाल प्रेरणा देणारे आहे असे प्रतीपादन केंद्र गट साधन केंद्र समन्वयक  कल्याण बागल यांनी  केले.
नुकतेच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझि शाळा - सुंदर शाळा या स्पर्धेत परतुर तालुक्यातील संस्था गटातुन श्री समर्थ माध्यमिक विद्यालयास तृतीय पारितोषीक मिळाल्याबद्दल विद्यालयाचे कौतुक व अभिनंदन श्री कल्याण बागल सरांनी केले.

शाळेत सातत्याने विवीध ऊपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याबद्दल केंद्र प्रमुख श्री शंकरराव थोटे सरांनी शाळेचे कौतुक केले.
मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांच्या संकल्पनेतुन व संकलनातुन सदरील रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
 धनबा सर व विद्यालयाचे सर्व कर्मचारी या वेळी ऊपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत