सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

ॲड. सुरेश काळे यांना जाहीर झाला महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार


परतुर प्रतिनिधी- कैलाश चव्हाण
   परतुर वकील संघाचे सचिव ॲड.सुरेश काळे यांना सुप्रीम ह्युमन राईट इंटेलिजन्स इंडिया या संस्थेमार्फत महाराष्ट्र गौरव पुरस्कार मराठवाडा विभागातून घोषित झाला आहे. 
  अहो रात्र दिन, दुबळ्या ,वंचित ,शोषित ,पीडित आदिवासी समूहासाठी पोट तिडकीने व स्वतःला झोकून देऊन काम करणारे असे सर्वसामान्यतून उभा राहिलेले नेतृत्व ॲड.सुरेश काळे यांना नुकताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या अनुषंगाने परतुर मंठा विधानसभेचे लाडके आमदार मा.बबनरावजी लोणीकर साहेब यांनी त्यांचा भ्रमणध्वनी द्वारे अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी व मित्रमंडळींनी त्यांना या पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्या सर्वच स्तरातून या पुरस्काराची चर्चा केली जात आहे. येणाऱ्या 02 मार्च 2025 रोजी नाशिक येथे या पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत