प्रापंचिक मनुष्याच्या उद्धारासाठी रामकथेचा आधार - रामायाणचार्य विष्णू महाराज बादाड
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
कलयुगाच्या प्रभावाने संसारीक मनुष्याची साधक वृती ही बाधीत होत आहे . मनुष्य आज काल दुसर्याचे बघून अनुकरण करत आहेत व त्याला शिष्टाचार समजत आहे पंरतू एखाद्या साधकाने केलेला परमार्थ त्याने केलेल्या साधना यांचे अनुकरण कधीच करत नाही कारण की त्याच्यावर असलेला कलीचा प्रभाव आहे तो प्रभाव ससांरिकाला टाळा याचा असेल . तर त्याला रामकथेचा आधार घ्यावाच लागेल असे प्रतिपादन रामायणाचार्य विष्णू महाराज बादाड यांनी कानडी येथे केले रामकथा ही आपल्या संपूर्ण जीवनाचे जीवनामृत असून त्या जीवनमा मृताचे रसपान आपण कथेच्या माध्यमातून जर घेतले तर या राकथेची कृपा संसारी कावर झाल्याशिवाय राहणार नाही गरज आहे ती ही रामकथा आपण मनोभावे स्वीकारली पाहिजे
आज काल संकट आल्यावरच आपल्याला देव आठवतो अशा संकृचित वृतिने परमार्थ करणार्याना कसा मोक्ष प्राप्त होणार भगवत भक्ती करत असताना कुठलाही स्वार्थ समोर ठेवून जर आपण भक्ती करू तर ती भगवंताला कधीच मान्य नसते . रामकथा की प्रत्येकाच्या जीवनाचा आधार असून रामांचा आपल्या स्वकीया बदल केलेला त्याग व समर्पण भाव आपण कधीच करणार नाही रामाचे बंधुप्रेम आपण स्वीकारावे हाच राम कथेचा उपदेश आज च्या या युगात महत्वाचा आहे
प्रापंचिक मानसाला सुखी जीवन जगण्यासाठी त्रेतायुगातील रामप्रपुच चरित्र श्रवण करण्याची आवश्यकता आहे... असे विष्णु महाराज बादाड यांनी सांगीतले....
कानडी येथे 13 मार्च चालु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये तुकाराम महाराज गाथा पारायण, हरिपाठ किर्तन व तुलशी राम कथा अशा कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे... यानी आज राम कथा संसारीक मानसाला ऐकने किती गरजेच आहे ते सांगीतले... कारण रामप्रपुच चरित्र एका आदर्श राजाची कथा आहे, एका आदर्श भावाची कथा आहे,एका आदर्श पतीची कथा आहे एका आदर्श मित्राची कथा आहे ऐवढच नाही तर राम प्रभुची कथा एका आदर्श शतृची कथा आहे... राम प्रभुणे आपल्या शतृला रावनाला सुद्धा मोक्ष दिला... असे अनेक भाग अनेक संदेश या रामायणातुन प्रतेकाला घेण्यासारखे आहेत... एका घराचा मालक कसा असावा हे राम प्रभुच चरित्र ऐकल्यानंतर आजच्या घरातील मालकाला कळेल कि घराचा मालक कसा असावा... रामायणातील सावत्र बंधुप्रेम काय आहे हे आजच्या प्रतेक भावाने ऐकन गरजेच आहे कारण बंधुप्रेमाची आजही प्रतेक घरात गरज आहे... घरातील प्रतेक पत्निने राम कथा ऐकली पाहिजे या राम कथेच्या माध्यमातून सितामातेच चरित्र ऐकल्यानंतर आपल्या घरातील पत्निला कळेल कि एक पत्नी कशी आदर्श आसली पाहिजेत... प्रतेकाला या राम कथेतुन घेण्यासारखे संदेश आहेत म्हणून प्रतेकाने श्रवण करण गरजेच आहे... असे बादाड महाराज यांनी कथा आरंभी संबोधित केल आहे.
राम कथा ही मनुष्याला आदरभाव बंधूंता त्याग व समर्णण शिकवते आज काल प्रत्येक कृटूबांने राम कथा स्वीकारली तर महाभारत होणार नाही असा उपदेश बादाड महाराज यांनी केला