मनुष्याच्या आयुष्यात धर्म महत्वाचा तो जपणे गरजे,श्री गीता रामायण सत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प .पू . आनंद चैतन्य बापू यांचे बेलोरा येथे प्रतिपादन
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
श्रद्धे शिवाय धर्म असू शकत नाही . धर्म हा आमचा प्राण आहे तो प्रत्येकानी जपलाच पाहिजे . धर्मा रक्षिती रक्षीताः धर्माच्या रक्षणाचे कर्तव्य हे प्रत्येकाने केले पाहिजे ते पण श्रद्धा ठेवून . धर्माची उत्पती ही श्रद्धे शिवाय होऊ शकत नाही श्रद्धा ही फक्त आहे म्हणून कसे जमेल आपल्याला तीचे प्राकटय करण विश्वासाने करावेच लागेल म्हणून श्रद्धा ही महत्वाची आहे . संसारिक मनुष्य खूप मेहनत करतो त्या मेहनतीतील थोडी जरी मेहनत आपण श्रद्धेने भगवत भक्ती साठी केली तर त्या भंगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन बेलोरा येथे चालू असलेल्या श्री गीता रामायण सत्संगाच्या दुसर्या दिवशी प्रतिपादीत केले श्रद्धा वीन धरम नही होई या रामायणातील चौपाई वर निरूपण केले