राज्य शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत,अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान,राज्यसरकार कुंभकर्णा सारखे झोपेत -आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात



प्रतिनिधी(जालना)
मराठवाड्यात गेल्या चार दिवसात गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्शवभूमीवर राज्य शासन आदेशाची प्रशासन वाट पाहत आहे कि सरकार पंचनामे करण्याचे आदेश देईल, परंतु राज्य सरकार आपल्या गैरकारभरात गुंतले आहेत बलात्कार, खून, खंडणी अश्या वेगवेगळ्या प्रकरणात राज्यसरकार चे दररोज धिंडवडे निघत आहेत.

अश्या परिस्थिती राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे शासन मदत करणार नाहीच परंतु प्रशासनाने वेळ न दवडता राज्यसरकार च्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ मराठवाड्यात झालेल्या शेती च्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासन दरबारी अहवाल पाठवावा.

आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रा द्वारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मागणी केली आहे.

चार दिवस उलटून देखील अवकाळी पावसाने, गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत ज्यावेळी राज्य सरकार आदेश देत नसेल त्यावेळी पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतात त्यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनास पाठवावा असे पत्र आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती