लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

राज्य शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत,अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान,राज्यसरकार कुंभकर्णा सारखे झोपेत -आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात



प्रतिनिधी(जालना)
मराठवाड्यात गेल्या चार दिवसात गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्शवभूमीवर राज्य शासन आदेशाची प्रशासन वाट पाहत आहे कि सरकार पंचनामे करण्याचे आदेश देईल, परंतु राज्य सरकार आपल्या गैरकारभरात गुंतले आहेत बलात्कार, खून, खंडणी अश्या वेगवेगळ्या प्रकरणात राज्यसरकार चे दररोज धिंडवडे निघत आहेत.

अश्या परिस्थिती राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे शासन मदत करणार नाहीच परंतु प्रशासनाने वेळ न दवडता राज्यसरकार च्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ मराठवाड्यात झालेल्या शेती च्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासन दरबारी अहवाल पाठवावा.

आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रा द्वारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मागणी केली आहे.

चार दिवस उलटून देखील अवकाळी पावसाने, गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत ज्यावेळी राज्य सरकार आदेश देत नसेल त्यावेळी पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतात त्यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनास पाठवावा असे पत्र आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत