लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध आंदोलन



परतूर,ता.३१ प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 येथील विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या वतीने जांबसमर्थ येथील मूर्ती चोरीच्या प्रकरणी तसेच आंबा येथील गाईंच्या मृत्यूप्रकरणी मंगळावारी (ता.)३० रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तसेच पोलीस ठाण्यात निषेध आंदोलन करून समस्त हिंदू बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जांबसमर्थ या ठिकाणी श्रीरामाचे पुरातन मंदिर असून या मंदिरामध्ये ७०० वर्षांपूर्वीच्या श्रीराम,सीता,लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न आणि वीर हनुमानाच्या पंचधातूच्या मुर्त्या होत्या,त्या मुर्त्या अज्ञातांनी मागील १० दिवसांपूर्वी चोरून नेल्या त्यामुळे संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असल्याने या चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच आंबा गावात पोळ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेत बागेश्वरी देवीच्या मंदिरातील गाईंचा विद्युत तारांना धक्का लागून मृत्यू झाला.झालेली ही घटना संशयास्पद असल्याची गावकरी सांगत आहेत.संबंधित घटना घातपात असल्याने या घटनेचा पूर्ण तपास करून घटनेला जबाबदार असणाऱ्याला योग्य शिक्षा करण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.
    झालेल्या आंदोलनात आंबा येथील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर  माजी मंत्री आ.बबनराव लोणिकरसुभाष अण्णा अंभुरे,बप्पा मसलकर,डि,वाय.काटे,भगवानरावजी मोरे,मुरलीधर देशमुख (नगरसेवक) माधवराव कदम,गोविंद सातोनकर,विश्व हिंदू परिषदेचे सावता काळे,डाँ.कल्याण बोनगे,डाँ.सुधीर आंबेकर, अर्जून जगताप, महेश नळगे,कांताराव सोंळके प्रशांत बोनगे, कैलाश चव्हाण,नामदेव कोरडे,बाळू पठाडे,सतीश बोनगे,बालासाहेब बोनगे,गोरखनाथ झिंजाडे,बाबुराव राऊत,अनिल देशपांडे,विठ्ठल कुलकर्णी,तुळशीरामजी निकाळजे,हेमंत कुलकर्णी,दत्ता देशपांडे,सचिन काटे,तुकाराम बोनगे,डिगांबर झिंजाडे,शिवाजी झिंजाडे, कैलाश बोनगे यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान,यावेळी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे याच्या मार्गदर्शना खाली संजय वैद्य व सचिन पुंडगे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत