सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

युवा मोर्चाची मराठवाड्यामध्ये मोठी ताकद पदवीधर मतदारसंघात भाजपा चा उमेदवार निवडून अणन्या साठी पूर्ण शक्ती लावणार- प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


नांदेड(प्रतिनिधी)
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष ,आणि शेवटी मी, ही विचारधारा घेऊन चालणारा भारतीय जनता पार्टी हा भारतीय राष्ट्रीयत्व  मानणारा पक्ष असून येत्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी युवा मोर्चा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले.
      पदवीधर मतदार संघाच्या नांदेड ग्रामीणच्या अर्धापूर जि नांदेड येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते
   या वेळी व्यासपीठावर खा प्रताप पाटील चिखलीकर,भा ज पा विभागीय संघटन मंत्री संजयजी कोंडगे, भा ज पा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख ,ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव इंगोले, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेभाऊ देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती .
       पुढे बोलताना महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की दोन, तीन निवडणुका अगोदर मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला होता जयसिंगराव काका गायकवाड ,श्रीकांतजी जोशी आदी मान्यवरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा पुन्हा एकदा या मतदारसंघाचा पदवीधर मतदार संघाचा आमदार भारतीय जनता पार्टी चा केल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले .
मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची व युवा मोर्चा ची पाळेमुळे खोलवर रुजलेली असून आपण सर्वजण सर्व शक्ती एकवटून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले .
      पुढे ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला, घराणे खानदान न पाहता  जाती-धर्म च्या पलीकडे जाऊन संधी दिली जाते त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाला संधीसाठी काम करण्याची ही वेळ असून आपल्या कामाच्या माध्यमातून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत