लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण समिती तळणी यांच्या वत्तीने व्याख्यानाचे आयोजन

श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण समिती तळणी यांच्या वत्तीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते  या ख्यानाचे मुख्य वक्ते ह भ प दत्तात्रय महाराज पवार यानी राम भक्ताला मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर ह भ प ज्ञानेश्वर माऊली वाघाळेकर चरणदास महाराज जनकवार याची प्रमुख उपस्थीती होती अयोध्या येथे मोठया प्रमाणावर राममंदीर बांधकांम सुरु असुन निधी संग्रह व प्रत्येक कुटुबां पर्यन्त संपर्क करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यन्त संपर्क करून त्याना या अभियानात समाविष्ट करणार असुन  मंठा तालुक्यातील  बेचाळीस हजार कुटुंबा पर्यन्त पोहचण्याचे लक्ष असल्याचे अभियान प्रमुख बालासाहेब बोराडे यांनी सांगीतले 
यावेळी उपस्थीताना मार्गदर्शन करताना यानी या अभियानाबद्दल माहीती दिली तसेच प्रभू रामचद्र यांच्या जीवनपद्धतीवर प्रकाश टाकला प्रभू राम हे त्यागाचे प्रतिक होते मर्यादा पुरुषोत्तम राम हे सपूर्ण विश्वाचे पालन कर्त आहेत जो राम नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते' आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते. म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुणमूर्ति नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते. पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण रामनाम घेतल्यावर, भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्‌बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त राम नामात आहे रामानी सर्वाना सघटीत करून असुरी शक्तीचा विनाश केला आहे परकीय आक्रमणातून पाडण्यात आलेल्या या मंदीराच्या निर्मीती साठी मोठी कसरत राम भक्ताना करावी लागली कधी काळी परकीयानी केलेला छळ तर कधी राजकीय असमर्थताच्या मेळामध्ये भावना दुखावल्याचे अनेक उदाहरण पाहावयास मिळते 

या मदीर निर्मीती साठी अनेक आंदोलने झाली मदीरा विना पोरकी असलेली अयोध्या खऱ्या अर्थाने  पाच आगस्ट रोजी स्वतञ झाली सुप्रीम कोर्टानी दिलेला निकाल सर्व भारतीयांनी एक दिलाने स्वीकारून सपूर्ण जगासमोर एक आदर्श निर्माण केला 



गेली साडेपाचशे वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या मंदीराचा  प्रश्न  सुटला असुन या साठी लाखो रामभक्तानी आपले बलीदान दिले आहे भव्य राममदीराच्या उभारणी साठी प्रत्येक हिन्दूचा यात समावेश असला पाहीजे राममंदीर हे राष्ट्रमंदीर असले पाहीजे कोणा एका नावापूरते ते मर्यादीत राहू नये ज्या ज्या वेळेस आपण प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीत दर्शनासाठी जाऊत त्या वेळेस या मदीर बांधकांमात माझा सुद्धा खारीचा वाटा आहे याची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असली पाहीजे राम मंदीर निर्मीती साठी सांधू संतांनी मोठे कष्ट घेतले  या अभीयानासाठी सपूर्ण मंठा तालूक्यामध्ये घरोघरी जाऊन रामभक्त या अभियानात जोडणाऱ आहेत प्रत्येक मंडला च्या स्थांनी मंडल बैठकाचे आयोजन करून मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे 
या व्याख्यानाच्या यशस्वीते साठी सुभाष राठोड सचिन सरकटे  लखन चंदेल बाळू  चव्हाण शरद सरकटे सिध्देश्वर सरकटे भगवान सरकटे शिवाजी सरकटे योगेश ईक्कर कार्यक्रमाचे सुञ संचालन सतिश अन्ना सरकटे यानी केले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत