लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

परतुर तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रुपये 7 हजार 478 लाभार्थयांच्या खत्यात जमा,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे वृध्द अपगांना मिळाले मानधन

 परतूर प्रतिनिधी - श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत परतूर तालुक्यातील 7  हजार 478 वृद्ध, अपंग, विधवा, निराधार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रु मानधन  जमा झाले असून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वृद्ध,अपंग, निराधारांना मानधन सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी  विविध ठिकाणी कॅम्प लावून मिळावे घेऊन लाभार्थ्यांच्या मानधनाचा मार्ग मोकळा केला होता त्यामुळे परतूर तालुक्यातील 7 हजार 478 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून लाभार्थ्यांकडून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना धन्यवाद दिले जात आहे.
           
       परतूर तालुक्यामध्ये श्रावण बाळ योजनेचे अ गटातील लाभार्थी 2835 असून  त्यांना 65 लाख 63 हजार 700  तर ब गटामध्ये 90 लक्ष 90 हजार  रुपयाचे अनुदान जमा झाले आहे तर संजय गांधी योजने अंतर्गत 198  विधवा लाभार्थ्यांना 2 लाख 77 हजार 200  व अपंग लाभार्थ्यांना 1 लाख 56 हजार 800  तर  निराधार योजनेतील 1333  लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 26 लाख 66 हजार  रुपये मानधन जमा झाले आहे अशी माहिती   भाजपाच्यावतीने दिली आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत