सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

लातूरच्या अधिवेशनास मोठया संख्येने उपस्थित राहावेजिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांचे आवाहन



परतूर :(रवी पाटील) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येत्या रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनास जालना जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना गुजर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येत्या रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभागातील पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश संघटक संजय भोकरे, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
इतरही अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. लातूर शहरातील बार्शी रोडवरील दयानंद सभागृहात सकाळी १० वाजता या अधिवेशनास मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी केले आहे.

चौकट


राज्य, विभाग, जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांवर या अधिवेशनात सखोल चर्चा होऊन उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दिगंबर गुजर,   जिल्हाध्यक्ष जालना

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत