लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

परतूरात महावितरचा कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित करून भाजपा युवामोर्चाचे ठिय्या ,आंदोलन बबनराव लोणीकर यांच्या भ्रमणध्वनी नंतर श्रीष्टी सर्कलसह परतूर तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत



परतूर(प्रतीनीधी) थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी सरसकट शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा पवित्रा महावितरणने घेतल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेत भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता परतूर शहरातील  महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. महावितरण कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडित करून सहायक अभियंत्याच्या दालनात तब्बल २ दोन ठिय्या देत जोरदार घोषणा घोषणाबाजी केली. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपा युवामोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे कडक पवित्रा घेता आक्रमक आंदोलन करण्यात आले.  जो पर्यंत खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरु केला जात नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला होता.ठिय्या आंदोलन मध्ये सहभागी यावेळी भाजपा तालुका रमेश भापकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे युवामोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संपत टकले,रमेश आढाव,नितीन जोगदंड, शिवाजी पाईकराव,वसंत बेरगुडे, रयत क्रांतीचे गजानन राजबिंडे,संभाजी खवल, धोंडीराम नवल,  राजेश ढवळे, संभाजी शिंदे,सदाशिव खवल,शिव संग्रमचे सचिन खरात,सूर्यभान कदम विष्णु मचाले, शुभम कठोरे, कैलास खालापुरे,करण गोरे,किसनराव आघाव, सुरेश भूंबर, पांडुरंग बरकुले, आसाराम नवल  आदींची उपस्थिती होती.
सुरुवातीला महावितरण कार्यालयासमोर ठिय्या दिलेल्या आंदोलकांनी काही वेळाने अक्रमक पवित्रा घेत उपकार्यकारी अभियंत्यांचे दालन गाठले. दालनाचा ताबा घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. युवामोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी कार्यालयातील विद्युत पुरवठा बंद करून आतील ट्यूबलाईट,पंखे  काढून घेतल्या गेले. आंदोल आक्रमक झाल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले.

*वीजबिलासाठी महावितरण शेतकऱ्यांना कुठल्याही नोटीसा न देता मनमानीपणे वीजपुरवठा बंद करते. हीच तत्परता एखादा ट्रान्सफार्मर बंद बदल्यावर का दाखवत नाही. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी शोर्ट सर्किट मुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून मोठे आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागते. यापुढे शोर्टसर्किट मुळे ऊस जळाला तर संबंधित शेतकऱ्याला महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केली*.
 रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असतांना, महावितरणची ही हुकुमशाही शेतकरी सहन करून घेणार नाही. मंत्र्यांच्या मतदार संघात कमी पैसे भरून घेत वीज पुरवठा सुरु केला, मग आमच्यावर हा अन्याय का ? असा सवाल उपस्थित करत  कणसे यांनी  महावितरण अभियंत्यांना धारेवर धरले. 

 लोणीकरांची मध्यस्थी : माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर व राहुल भैय्या लोणीकर यांनी भ्रमणध्वनीवरून उपकार्यकारी अभियंता एन.व्ही.बेंडाळे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा अधिकार महावितरणला नाही. महावितरणने अशी अडेल भूमिका घेतली तर जशास तसे उत्तर देऊ असे सांगत  वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत आदेशित केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत