सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

विटा महाग, लाभार्थ्याचे बजेट कोलमडले.


परतूर (हनूमंत दवंडे)
परतूर तालुक्यात घरकुल योजने अंतर्गत अनेक घराचे बांधकाम सुरु आहे.आधीच बांधकामाकरिता वापरात येत असलेल्या विविध साहित्याच्या दरात भरमसाठ वाढ झाली असतानाच आता वीट भट्टी मालकांनी ही विटाचे दर वाढविल्याने ही दरवाढ घरकुल लाभार्थ्याचे बजेट बिघडवणारी ठरत आहे .शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना ,रमाई घरकुल योजना, समाज कल्याण विभाग घरकुल योजने अंतर्गत परतूर तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना विशिष्ट मर्यादित घरकुल बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाकरिता वापरात येणाऱ्या साहित्यात दरवाढ झाली असल्याने लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रेती, लोहा, सिमेंट ,मुरूम ,विटा ,आधी साहित्याचा समावेश आहे. विटा ची मागणी वाढ ली याचा फायदा घेत विटा भट्टी मालकाची मनमर्जी चालू  झाली आहे .वीटभट्टी मालक प्रति ट्रॅक्टर नऊ हजार रुपये दर आकारीत असल्याने लाभार्थ्यांना घरकुल कामात अडचणी येत आहेत..

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत