लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची वाहनधारकांवर कारवाई


 मंठा -- (सुभाष वायाळ)दि. 4 मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर शहरातील पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी कारवाई केली. यामध्ये वशिष्ठ बळीराम बोराडे राहणार आंबोडा कदम,अशोक भारतराव थोरात  राहणार नांदगाव,शिवाजी बंसी पवार राहणार गारटेकी, विकास भगवान ईघारे राहणार कीर्तापूर, आदिनाथ संभाजी जाधव राहणार तळतोंडी ही सर्व वाहने वाहनधारकांनी बेशिस्तपणे मुख्य रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांनी वरील सर्व वाहनधारकांवर कारवाई केली आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, प्रशांत काळे,विलास कातकडे, दिपक आढे, सुनील ईगल, दिपक ढवळे, वसंत राठोड यांनी केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध वाहतूक व बेसिस्त वाहन धारक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत