सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

विडोळी येथे नाट्य अभिनय दिग्दर्शन कार्यशाळा संपन्न



मंठा (सुभाष वायाळ)-दि.10 मंठा तालुक्यातील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा विडोळी येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून दोन दिवसीय नाट्य अभिनय दिग्दर्शन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व यातूनच एखादा कलाकार निर्माण व्हावा. यासाठी नाट्यकलावंत, दिग्दर्शक, सतीश पाटील खरात लिंबे वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना आंगिक ,वाचिक, अभिनय व नाट्य लिखाणाचे धडे दिले.नाट्य सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करून घेतले. यामध्ये विद्यार्थ्यांचा भरभरून असा प्रतिसाद दिला.यावेळी   मुख्याध्यापक श्री राजाराम बोराडे, तसेच शिक्षक श्री किशोर निर्वळ,श्री प्रभाकर वायाळ,श्री अण्णा लंगडे, श्री.पांडुरंग वगदे, श्री परमेश्वर सोनटक्के, श्री मोहोर, श्री.वेळेकर, श्री.रामा चव्हाळ, श्रीमती अनिता चव्हाण, श्रीमती वर्षा वानखेडे शिक्षक, विद्यार्थी,व गावकरी मंडळी उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत