सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ वाटूरात भव्य रास्ता ,ररस्ता रोकोपक्ष गट तट आणि संघटना बाजूला ठेवून ओबीसी समाज एकवटला,आरक्षण नाही तर निवडणूका नाहीची घोषणाबाजी



परतूर(हनूमंत दंवडे) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी प्रवर्गातील जात समूहाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात झाल्याने ओबीसी समाजातुन तीव्र संताप व्यक्त केला जात असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, सर्व गट तट पक्ष संघटना बाजुला ठेवून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव एकवटल्या चे चित्र यावेळी दिसून आले, आरक्षण नाही तर निवडणूका नाही आशा घोषणाबाजी करत तब्बल दोन तास ठिय्या मांडण्यात आला.
याविषयी अधिक माहिती अशी की,मंगळवार दिनांक 11 रोजी वाटूर फाटा ता परतूर येथे नांदेड जालना महामार्गावर सदरील आंदोलन करण्यात आले,राज्यातील ओबीसी समाज राजकीय अरक्षणापासून वंचित झाला असून झालेल्या अनेक निवडणूका अरक्षणाविना घेण्यात आल्याने ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त यावेळी दिसून आला, सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आरक्षण पुन्हा मिळावे याकरिता ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गावागावातून हजारो ओबीसी बांधव उपस्थित झाले होते,ओबीसी समाजातील विविध घटकातील लोक आपल्या वेशभूषा परिधान करून या आंदोलनात सहभागी झाले होते,या आंदोलनात परतूर तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,आंदोलनासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौज फाटा तैनात करण्यात आला होता,रास्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या,ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती परतूर या बॅनर खाली हे आंदोलन पार पडले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत