सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

हातडी येथे सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली =================


परतूर / हनुमंत दवंडे

परतूर तालुक्यातील हातडी येथे सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळ व सर्व महिला ग्राम संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून   ,पोलीस कॉन्स्टेबल निता नवले 
 निता नवले (महिला पोलीस कॉन्स्टेबल ) गंगाताई जोगदंड (महीला बचतगट सुपर वायसर)सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गाढवे,उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड  सरपंच, उपसरपंच, सर्व ग्राम पंचायत महिला सदस्या, आरोग्य सेविका  आशा कार्यकर्ती   शाळेतील विद्यार्थी व हातडी येथील ग्रामस्थ यांची उपस्तीती होती या वेळी संस्कृती झरेकर, स्वरा झरेकर, शारदा बोरकर, संस्कृती बोरकर यांनी यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरवात केली .  या नंतर पोलीस कॉनीस्टेबल निता नवले  यांनी मार्गदर्शन केले बोलतांना त्या म्हणाल्या मुलींनी शिक्षणावर भर द्यावा कोणीही बालविवाह करू नये महिलांवर कौटोंबिक अत्याचार होत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा   या नंतर समता कलामंच येनोरा यांनी लेक वाचवा लेक शिकवा ,ही शैक्षणिक नाटिका सादर केली  या मध्ये हरिभाऊ गायके, शरद साळवे, गणेश घोडे सो पवन घोडे, श्रद्धा वाघमारे भास्कर साळवे, अर्जुन नबाजी गाढवे गजानन गोरे  यांनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत