सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

ओबीसी समाजाचा वाटुर येथे रास्ता रोको उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.....




परतूर/प्रतिनिधी हनूमंत दंवडे
        ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणाचा मुद्दा आता जोर धरू लागला आहे सर्वोच्च न्यायालयात तांत्रिक बाबीची पूर्तता न झाल्याने राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याने तालुक्यातील ओबीसी समाजामध्ये असंतोष पाहायला मिळत आहे याबद्दल तालुक्यातील गावागावात जाऊन समनव्य समिती बैठका घेत असून या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे 
राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने तालुका ओबीसी समाजाच्या वतीने ११ जानेवारी रोजी वाटुर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की ओबीसी घटकाला घटनेने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मागविलेल्या तांत्रिक बाबीची पूर्तता न झाल्याने अडचणीत सापडले आहे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार तिहेरी चाचणी चा अवलंब करून त्यासंबंधी त्यावर आधारित माहिती सादर करणे बाबत सुचविले आहे सदरील तथ्यावर आधारित माहिती सादर न झाल्याने न्यायालयाने सुचविल्या प्रमाणे निवडणूक आयोग ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे त्यामुळे ओबीसी घटकासाठी आवश्यक असलेले आरक्षण सद्यस्थिती संपले आहे अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पंचायत,महानगरपालिका निवडणुकीत ओबीसींना डावलुन निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे त्यामुळे सर्वसामान्य ओबीसी घटकांचे समस्या निवारणार्थ प्रतिनिधित्व आभारी त्या घटकावर अन्याय होत आहे काही दिवसांतच परत महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका,नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या निवडणूका आरक्षणाशिवाय घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत त्यामुळे तो त्वरित तिहेरी चाचणी करून तर त्यावर आधारित माहिती त्वरित संकलित करून सर्वोच्च न्यायालयात एक महिन्याच्या आत सादर करून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा व ओबीसी समाजाला न्याय द्यावा ओबीसी घटकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचण्यासाठी सकल ओबीसी समाज समन्वय समिती च्या वतीने दिनांक 11 जानेवारी रोजी अकरा वाजता वाटुर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
असे या निवेदनात म्हटले आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत