लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

यश ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



  परतूर (शेख अथर )तालुक्यातील सातोना खुर्द येथे यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यश इंग्लिश स्कूल येथे  73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण युवानेतृत्व  यश महेशराव  आकात  यांच्या हस्ते करण्यात आले.   याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून यश महेशराव आकात , स्वप्निल  आकात ,विलासराव लाटे,अनंतराव आकात, संतोष आकात ,आकाश आकात, संदीप कवडे , शामीर शेख , यश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  जयराम खंदारे व यश इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल अनिल बोराडे  यांची उपस्थिती होती . 
      कार्यक्रमाचे  प्रस्ताविक जयराम खंदारे  यांनी केले, तसेच प्रजासत्ताक दिनाचे महत्व यश महेशराव आकात व  संदीप कवडे  यांनी सांगितले. राष्ट्रीय सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याबरोबरच प्रत्येक भारतीयाने  आपल्या क्षेत्रात महान कार्य करून देशहितासाठी महत्त्वाचे योगदान दिले पाहिजे असे आवाहन यश आकात यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  बळीराम भले  यांनी केले.कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत