लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

बाबुलतारा येथील कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णु जगताप यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

         परतूर (हनूमंत दंवडे)   बाबुलतारा येथील कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णु जगताप  यांनी आपल्या  समर्थकांसह शिव सेनेत जाहिर प्रवेश केला  त्यांनी शिवसेनेचे उप ता प्रमुख  रामचन्द्र काळे यांच्या मार्गदर्शना खाली हा प्रवेश केला त्यांचा प्रवेश  जालना येथे मा मंत्री अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी झाला 
              या वेळी  अर्जुनराव खोतकर यांच्या सह जिल्हा संघटक मोहन अग्रवाल ता प्रमुख अशोकराव अघाव ,किसान सेनेचे माउली राजबिंडे, संदीप पचारे आदि उपस्थित होते या प्रंसगि जगताप यांनी सांगितले कि  जी प निवडणूकीत रामचंद्र  काळे यांना  निवडूण आण्या साठी आपण  प्रयत्न करुण व तो सार्थ ठरवणार असल्याच प्रतीपादन केले   हीच खोतकर साहेबांना  वाढदिवसाची भेट देणार असल्याच त्यांनी शेवटी सांगितले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत