सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

तहसीलदारांचे आदेश झुगारून खोदकाम न करता कामे सुरूचरस्त्याखाली इमारती जात असल्याने पाणी जाण्याची भीती !

परतूर: प्रतिनिधी
परतूर शहरामध्ये नगरपालिका निवडणूक जाहीर होताच प्रभागात सिमेंट रस्त्याचे काम जोरात सुरू आहे परंतु सदरील काम माती मिश्रित वाळू, कच व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरल्याने प्रभागातील रस्ते उखळल्याचे तर अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे प्रकार पहावयास मिळाले. शहरात होत असलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड ओरड झाल्यानंतरही पालिकेने मात्र अडमुठे धोरण स्वीकारत खोदकाम न करता रस्त्यांचे काम सुरू ठेवलेले आहे. याबाबत काही नागरिकांनी जिल्हाधिकारी सह पालकमत्री राजेश टोपे, माजी मंत्री आ.लोणीकर, पालिका प्रशासक उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे तक्रारी केल्यानंतरही सदरील काम बोगस पद्धतीने करण्याचा सपाटा सुरू आहे. 

पावसाचे पाणी इमारतीत घुसणार
------------------
प्रभागात अनेकांच्या जुने बांधकाम असलेल्या इमारती खोदकाम न करता रस्त्यावर रस्ता करीत असल्याने इमारती रस्त्याखाली जात असल्याने या इमारतीमध्ये पावसाळ्यात पाणी घुसण्याची शक्यता आहे गतवर्षीच नवीन रस्ते झालेल्या रस्त्या शेजारील घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे प्रकरण ताजे असताना पालिकेने यापासून धडा घेण्याऐवजी बेधडक कामे सुरु ठेवली आहे. 
गट वेळेस जेथलिया यांनीच लोणीकर यांच्या रस्त्याच्या कामाला या कारणानेच विरोध केला होता, आज जेथलिया यांच्याच पालिकेत हा प्रकार चालू आहे यात सामान्य नागरिकांचे घर दुकाने पाण्यात जाणार आहेत.
 या कामाच्या स्थळी परवानाधारक कंत्राटदार व अभियंता कुठेच दिसले नाहीत. अप्रशिक्षित कामगारांच्या मार्फत सदरील कामे करण्यात येत असल्यामुळे सदरील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होत आहे.

आदेशाची अवहेलना
--------------------------
 याबाबत नागरिकांच्या तक्रारीचे अवलोकन करून तहसीलदार रूपा चित्रक यांनी मुख्याधिकारी यांना तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतरही आदेश झुगारून प्रभागातील कामे सुरु होते.
या बाबत मा.नगरविकास मंत्री सह विभागीय आयुक्त यांना या दर्जाहीन कामाच्या बाबतीत निवेदन देण्यात येणार असून झालेल्या सर्व कामाची उच्च स्तरावर चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत