लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

तहसीलदारांचे आदेश झुगारून खोदकाम न करता कामे सुरूचरस्त्याखाली इमारती जात असल्याने पाणी जाण्याची भीती !

परतूर: प्रतिनिधी
परतूर शहरामध्ये नगरपालिका निवडणूक जाहीर होताच प्रभागात सिमेंट रस्त्याचे काम जोरात सुरू आहे परंतु सदरील काम माती मिश्रित वाळू, कच व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरल्याने प्रभागातील रस्ते उखळल्याचे तर अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे प्रकार पहावयास मिळाले. शहरात होत असलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड ओरड झाल्यानंतरही पालिकेने मात्र अडमुठे धोरण स्वीकारत खोदकाम न करता रस्त्यांचे काम सुरू ठेवलेले आहे. याबाबत काही नागरिकांनी जिल्हाधिकारी सह पालकमत्री राजेश टोपे, माजी मंत्री आ.लोणीकर, पालिका प्रशासक उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे तक्रारी केल्यानंतरही सदरील काम बोगस पद्धतीने करण्याचा सपाटा सुरू आहे. 

पावसाचे पाणी इमारतीत घुसणार
------------------
प्रभागात अनेकांच्या जुने बांधकाम असलेल्या इमारती खोदकाम न करता रस्त्यावर रस्ता करीत असल्याने इमारती रस्त्याखाली जात असल्याने या इमारतीमध्ये पावसाळ्यात पाणी घुसण्याची शक्यता आहे गतवर्षीच नवीन रस्ते झालेल्या रस्त्या शेजारील घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे प्रकरण ताजे असताना पालिकेने यापासून धडा घेण्याऐवजी बेधडक कामे सुरु ठेवली आहे. 
गट वेळेस जेथलिया यांनीच लोणीकर यांच्या रस्त्याच्या कामाला या कारणानेच विरोध केला होता, आज जेथलिया यांच्याच पालिकेत हा प्रकार चालू आहे यात सामान्य नागरिकांचे घर दुकाने पाण्यात जाणार आहेत.
 या कामाच्या स्थळी परवानाधारक कंत्राटदार व अभियंता कुठेच दिसले नाहीत. अप्रशिक्षित कामगारांच्या मार्फत सदरील कामे करण्यात येत असल्यामुळे सदरील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होत आहे.

आदेशाची अवहेलना
--------------------------
 याबाबत नागरिकांच्या तक्रारीचे अवलोकन करून तहसीलदार रूपा चित्रक यांनी मुख्याधिकारी यांना तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतरही आदेश झुगारून प्रभागातील कामे सुरु होते.
या बाबत मा.नगरविकास मंत्री सह विभागीय आयुक्त यांना या दर्जाहीन कामाच्या बाबतीत निवेदन देण्यात येणार असून झालेल्या सर्व कामाची उच्च स्तरावर चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत