लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

परतूर येथील पारधी वाडा इंद्रा गिरी महादेव मंदिर येथील अतिक्रमण हटवण्यात यावे उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन सादर..


परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
इंद्रा गिरी महादेव मंदिर येथे कडब्याची पेंडी व कुपाटी टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. शेत गट नंबर 272 /2 मधील निजाम कालीन महादेव मंदिर असून सन 1981 पासून सदर मंदिर देवस्थानचे रामा मालू काळे हे अर्थक सेवक असून मंदिराची देखभाल व दुरुस्ती करतात व पूजाअर्चा करत आहेत. मंदिराच्या प्रवेश शंभर फूट जागा दक्षिणेस 20फूट जागा व उत्तरेस 20 फूट जागा अशी आहे सध्या सदर ठिकाणी विद्युत पुरवठा नाही तसेच सदर मंदिर परतूर शहरातील पुरातन मंदिर असून अनेक वर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला लोकांची जास्त प्रमाणात गर्दी होत असे सदर ठिकाणी इंगळा गिरी महादेव मंदिराचे समोर काही व्यक्तीनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे जेणेकरून सदर मंदिरासमोर दरवर्षी होणारी यात्रा करणे सुलभ होईल अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांना रामा मालू काळे यांनी दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत