सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती परतूर कार्यकारणीची निवड जाहीर


परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे 

सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह परतूर येथे आयोजित करण्यात आली या प्रसंगी पंचक्रोशीतील सर्व सामाजिक संघटना ,राजकीय पक्ष   पदाधिकारी उपस्थित होते , सर्वानुमते  कृष्णा सोळंके यांची अध्यक्ष तर सचिव  विष्णू मचाले , कार्याध्यक्ष  विक्रम धुमाळ , उपाध्यक्ष  नामदेव तौर , सहसचिव  लक्ष्मण बिलहारे , उपाध्यक्ष विष्णू काळे , कोषाध्यक्ष शाम शिंदे , यांची निवड करण्यात आली ,
या प्रसंगी शिवजन्मोत्सवाचे नियोजन करण्यात आले , शोभायात्रा अर्थात मिरवणूक सकाळी काढण्यात येणार आहे त्यात लहानमुले ,महिला सामील होणार आहेत , लेझीम पथक , देखावे , व शिवकालीन कला सादर करण्यात येणार आहेत , सर्व परतूर आणि परिसरातील शिवप्रेमींनी या शिवजन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले प्रसंगी मार्गदर्शक रमेश सोळंके , महेश नळगे , संपत टकले ,विनायक भिसे , विष्णू शिंदे , सचिन खरात , पांडुरंग नवल,दत्ता सुरुंग , गजानन चवडे, दिपक कदम , सिद्धेश्वर लहाने  , डी एन केवारे व सर्व आजी माजी नगरसेवक , सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी , सर्व सामाजिक संघटना उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत