सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मंठा तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणासाठी १६० लसीकरण केंद्र


मंठा प्रतिनिधी /सुभाष वायाळ
            दि.२५ मंठा तालुक्यात दिनांक २७ फेब्रुवारी रविवार रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. यासाठी तालुक्यामध्ये १६० लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली या ठिकाणी तालुक्यातील १८ हजार ९३० या पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना मोफत पोलिओ डोस दिला जाईल. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश मोटे यांनी सांगितले आहे. 
      पल्स पोलिओ लसीकरणासाठी तालुक्यात एकूण १६० लसीकरण बुथ उभारण्यात आले आहेत. सर्व लाभार्थी ना लस मिळावी यासाठी एसटी स्टँड,बांधकामाची ठिकाणी, रस्त्यांची कामे,ऊसतोड कामगार,वीटभट्ट्या,वाड्या इत्यादी ठिकाणाच्या लसीकरणासाठी ०७ मोबाईल पथक,०७ ट्राजिस्ट टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. असे तालुका नर्सिंग ऑफिसर अर्जुन हमिर्गे यांनी सांगितले. 
या लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून ०६ वैद्यकीय अधिकारी,३३ सुपरवायझर ४३६ आरोग्य कर्मचारी,एन.एम.एम,एम.पी.डब्ल्यू, अंगणवाडी,गटप्रवर्तक,अशा इत्यादी स्वयसेवक परिश्रम घेणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत