सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व चि.प्रशिक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब अनाथ मुलांना फळे वाटप करण्यात आली ...


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
सन ऑफ आंबेडकर परतूर ग्रुपचे सनी गायकवाड यांचे चिरंजीव प्रशिक गायकवाड यांच्या वाढदिवसाचा आगाऊ खर्च  टाळून रेल्वे स्टेशन परिसर, शासकीय रुग्णालय परतुर ,   परिसरातील  गोरगरीब अनाथ मुलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोहर  चिवडा ,बिस्कीट, केळी, चिकू ही फळे वाटप करण्यात आली. या वाढदिवसानिमित्त समाजाला आगळा वेगळा संदेश ही त्यांनी दिला आहे. तसेच माता रमाई जयंती उत्साहात साजरी करून हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच  सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक कामात अग्रेसर पद्धतीने परतूर शहरात सनी गायकवाड यांनी सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. आणि त्याच माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलाचा वाढदिवसाचा अवाढव्य खर्च न करता साध्या पद्धतीने चिरंजीव चि.प्रशिक गायकवाड यांचा वाढदिवस साजरी करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून नितीन साळवे ,शुभम  वाहुळ, तसेच गायकवाड परिवारातील सर्व सदस्य ,व सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतूर ची सर्व टीम चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत