सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर सार्वजनिक सेवाजन्मोत्सव समितीची कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पदी कैलास चव्हाण तर सचिव पदी प्रमोद राठोड

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
 परतुर सार्वजनिक सेवालाल महाराज जयंती जन्मोत्सव 2022 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही सतगुरू सेवालाल महाराज जयंती 15 फेबुरुवारी रोजी मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधव  जयंती साजरी करणार आहे या बैठकीमध्ये अध्यक्ष पदी कैलास चव्हाण तर सचिव पदी प्रमोद राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
सुनिल राठोड -उपाध्यक्ष
अर्जून राठोड-सहसचिव
विलास राठोड -सहसचिव
संजय चव्हाण-कोषाध्यक्ष
सचिन चव्हाण -सहकोषाध्यक्ष
किशोर जाधव -संयोजक
राहूल राठोड -सहसंयोजक
राहूल नारायण आढे -कार्यवाहक
अमोल पवार -सहकार्यवाहक
किरण आढे-प्रसिद्धी प्रमुख
सदस्य -पवन आढे,सचिन पवार, सचिन आढे, अविनाश राठोड, इंजी गणेश चव्हाण, रवी आढे, राहूल चव्हाण, डॉक्टर मनोज राठोड, इंजि. प्रशांत जाधव, वैभव राठोड, इंजि.कुलदीप राठोड,इंजि.राहूल रोहिदास राठोड.
 सर्व बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत