लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

शिवरायांचा पुतळा काढला तर कलेक्टरला शिवभक्त कदापि माफ करणार नाही - सिध्देश्वर काकडे



सेवली(सुभाष वायाळ )सेवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मोठ्या थाटात शिवभक्तांनी बसवला आहे. हा पुतळा काढण्याचा जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आदेश दिला आहे. या आदेशाला मराठा संघटनांसह शिव भक्तांनी विरोध दर्शविला आसल्याने सद्यस्थिती मध्ये हा पुतळा सेवली या ठिकाणी आहे. जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणजे हिंदुच आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवहेलना करता कामा नये. नाही तर जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांना शिवभक्त कदापीही माफ करणार नसल्याचे शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कुठंही बसला तर काय बिघडलं? सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अजिबात विरोध करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज हे या भुमीचे राजे आहेत. याचं भान जालना जिल्हा प्रशासनाने जपलं पाहिजे. जर सेवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला तर जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची खुर्चीच आपण रस्त्यावर आणुन टाकल्या शिवाय रहाणार नाही. आसा खणखणीत इशारा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत