सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

विलास आकात यांच्याकडून सुमेध घनघावला उपचारासाठी आर्थिक मदत

 
  परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे
  येथील सुमेध राजु घनघाव रा. परतूर (वय १९) याला आठ महिन्यापूर्वी अपघातात डोक्याला मार लागल्याने जखमी झाला होता. त्याचा उपचारासाठी सातोना     येथील भाजपाचे विलास आकात यांनी दहा हजार रुपये आर्थिक मदत केली आहे.    
  सुमेध घनघाव हा नातेवाईक सोबत परतुर ते आष्टी रोडवर एचपी पेट्रोलपंपच्या समोर पुलाजवळ गाडी खड्ड्यात जावुन गाडीवरील ताबा सुटल्याने दि. २६ जून २०२१ रोजी अपघात झाला होता. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सुमेध हा बेशुद्ध झाला. दवाखान्याला मोठा खर्च लागल्याने घरची शेती, ट्रॅक्टर, प्लॉट विकून, नातेवाइकाकडून पैसे आणून दवाखाना खर्च केला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिति बिकट असल्याने समाजातून आर्थिक मिळाली. सध्या त्याच्यावर औषध उपचार चालु आहे. जवळ असलेली आर्थिक पुंजी संपली असल्याने कुटुंबासमोर आर्थिक अडचणीचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या औषध उपचाराचा खर्च मोठा असल्याने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत