लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

गुरुजनांनी दिलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर सांभाळा.. -माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे : शंभू महादेव विद्यामंदिरात १२ वीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण नि रोप


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 शाळा-महाविद्यालयात शिकत असताना गुरुजनांनी दिलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर सांभाळा असे प्रतिपादन परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी केले.
    तालुक्यातील वाटूर येथील शंभू महादेव विद्या मंदिरच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्यानिरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.अदबने हे होते.
      या प्रसंगी बोलताना डाॅ.भगवान दिरंगे म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर खरे संस्कार होत असतात. पुस्तकातील ज्ञानाबरोबर जीवन जगण्यासाठी आवश्यक ते मूल्य शिक्षण शाळेत मिळते.त्या दृष्टीने शंभू महादेव विद्या मंदिरातील विद्यार्थी भाग्यवान आहेत. या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवनात आवश्यक असणारी मूल्ये शिकवली, या विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी शिस्त तर वाखाणण्याजोगी आहे. गुरूजणांनी दिलेली संस्काराची शिदोरी पुढील आयुष्यात कामी येत असते. असे ते शेवटी म्हणाले.
        अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डी.डी.अदबने म्हणाले की,शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल झाला पाहिजे. अभ्यासाबरोबरच जीवनात शिस्तीलाही तेवढेच महत्त्व आहे. आमच्या विद्यालयात शासनाच्या आदेशानुसार आणि कोरोना नियमांचे पालन करून अध्यापनाचे कार्य करण्यात आले. 
या काळात शिक्षकांनी केलेले कार्य निश्चितपणे कौतुकास्पद आहे.तसेच विद्यार्थ्यांनीही सर्व नियम पाळून सहकार्य केले. विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेल्या ज्ञानाचा आणि संस्काराचा निश्चितच लाभ होईल.परीक्षेसाठी आणि भावी जीवनासाठी विद्यार्थ्यांप्रती शुभेच्छा व्यक्त करून प्राचार्य अदबने यांनी परीक्षेच्या नियमांबाबत माहिती दिली.
    प्रा.कार्ले , प्रा.लिपणे, प्राध्यापिका परभणकर मॅडम यांनीही १२ वी परीक्षेची तयारी कशी करावी,परीक्षेच्या काळात अभ्यास कसा करावा, तणावमुक्त राहून परीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.
   या प्रसंगी व्यासपीठावर प्रा.मिसाळ, प्रा.आढे, प्रा.हजारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन परभणकर मॅडम यांनी केले तर आभार प्रकटीकरण प्रा.राठोड यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत